Monday, February 21, 2011

धुळे शिवजयंती २०११

धुळे शहरात शिवजयंती उत्साहात साजरी
धुळे, दि.20 (प्रतिनिधी)-(21-February-2011)
Tags : Dhule

शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येवुन शिवरायांना अभिवादन करण्यात आले. श्रीसाईनाथ मतिमंद विद्यालय- अंचाडे ता.धुळे येथील श्री साईनाथ मतिमंद निवासी विद्यालय येथे शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डी.बी. पाटील होते. मुख्याध्यापक छाया पाटील यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र कथन केले. अमरदीप खैरनार यांनी आभार मानले. कार्यक्रमास सुभाष पाटील, भरत पाटील, नंदराज पाटील, अणासाहेब पाटील, रवींद्र खैरनार, मोहन पाटील आदी उपस्थित होते. स्वाभिमान- येथील स्वाभिमान संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. साक्री रोडवरील स्वाभिमान संघटनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी धुळे जिल्हा स्वाभिमान संघटनेचे जिल्हा संघटक आनंद लोंढे, जिल्हा संपर्क प्रमुख राजन जगताप, जितेंद्र पाटील, अजय पाटील, प्रकाश अहिरे, दादु देसले, पप्पू पगारे, कपिल जाधव, विक्की लोंढे, गौरव सोनवणे, वंदेश साळवे, बंटी भामरे, विशाल वाघ, अमोल भामरे, राहुल वाघ, हेमंत लोंढे, सिध्दार्थ लोंढे, मिलिंद भालेराव, अरुण राऊत, प्रकाश ठाकरे, जितेंद्र वाघ, संदीप बनसोडे आदी उपस्थित होते. शाहूसेना- शाहुसेना जिल्हा धुळे शाखेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शाहु सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद साळुंके यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शाहीर भटू गिरमकर, संदीप पाटोळे, विजय देवकर, रवींद्र आघाव, मनोज बजाज, नेनेश साळुंके, राजेंद्र जाधव, अरुण मोहिते, चंद्रकांत थोरात, अनिल जगताप, चंद्रकांत थोरात आदी उपस्थित होते।


शिवाजींचे राज्य प्रेरणास्त्रोत होते शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या व्याख्यान कोकाटे यांचे मत
धुळे, दि.17-(प्रतिनिधी)( धुळे, 18-February-2011 )
Tags : Dhule
शिवाजी महाराजांचे राज्य गरीबांचे, उपेक्षितांचे राज्य होते. सामान्य लोकांसाठी ते प्रेरणास्त्रोत ठरणारे होते. त्यामुळे हे राज्य लोकांना आपले वाटत होते. असे मत शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.
शिवाजी महाराजांचे राज्य गरीबांचे, उपेक्षितांचे राज्य होते. सामान्य लोकांसाठी ते प्रेरणास्त्रोत ठरणारे होते. त्यामुळे हे राज्य लोकांना आपले वाटत होते. असे मत शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले. धुळे येथील श्री. शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचेतर्फे शिवजयंती निमित्त आज (दि.17) या दिन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. शहरातील गरुड मैदानावर व्याख्यानमाला होत असून आज या व्याख्यानमालेत शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी प्रथम पुष्प गुफले. शिवचरित्रातून या शिकावे या विषयावर ते बोलत होते. प्रारंभी व्याख्यामालचे उद्‌घाटन शिवचरित्रकार श्रीमंत कोकाटे यांच्यासह महापौर मोहन नवले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मात्री मंत्री रोहिदास पाटील, संस्थेचे चेअरमन कुणाल पाटील, सचिव उत्कर्ष पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस. टी. पाटील, गुणवंत देवरे आदी उपस्थित होते. यावेळी शिवचरित्रातून काय शिकावे या विषयावर बोलतांना श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले, सिद्दी जौहरने पन्हाळगडाला वेढा टाकला तेव्हा वेढा जास्त दिवस टिकून होता. यामुळे शिवाजी महाराज चिंतेत पडले. त्यांनी सिद्दी भेट घेण्याचे ठरविले. त्यानुसार आपला विश्वासू साथीदार शिवाजी काशीद याला त्यांनी शिवाजी महाराज म्हणून सिद्दीच्या भेटीला पाठविले. शिवाजी भेटीला येत असल्याचे समजल्यामुळे त्याचे सैन्य गाफील राहिले. याचवेळी शिवाजी महाराजांनी चलाखी करत संधी साधत सिद्दीच्या सैन्यावर हल्ला केला. याचवेळी इकडे शिवाजी काशिदला पकडण्यात आले. त्याला खोदूनखोदून विचारण्यात आले. पण त्याने अखेरपर्यंत आपण शिवाजी असल्याचे सांगितले. अखेर त्याला वधस्तंभावर बांधले. छातीला भाले लावले तरीही त्याने आपण शिवाजी असल्याचे सांगितले. त्याच्या छाती आणि पोटात भाले खुपसले तेव्हा खाली घसरत शिवाजी म्हणाला की, खोट्या शिवाजीची सुध्दा तुम्हाला पाठ दिसली नाही. तर खरा शिवाजी तुम्हाला कसा दिसेल. शिवाजी काशिद, बर्हिजी नाईक, तानाजी मालुसरे या लोकांना काही मोठा खजिना मिळाला नाही. पण त्यांना प्रेम मिळाले, प्रेरणा मिळाली. शिवाजीचे राज्य गरीबांचे, उपेक्षितांचे राज्य होते. त्यांनी कुणालाही उघड्यावर पडू दिले नाही. हा संदेश आत्ताच्या राज्यकर्त्यांनी शिवचरित्रातून घ्यायला हवा असेही त्यांनी सांगितले. याच व्याख्यानमालेत उद्या दि.18 रोजी गुलाबराव वळसेे पाटील हे एक अष्टपैलू राजा शिवछत्रपती या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहे.
शिवरायांचा इतिहास प्रेरणादायी -प्रा. पाटील
साक्री, दि. 20 (श.प्र.)- (21-February-2011)
Tags : Dhule

जगाच्या पाठीवर आजपर्यंत झालेल्या क्रांतीचे मुळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोक कल्याणकारी राज्य व्यवस्थेत आपणाला पहायला मिळाल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे शिवरायांचा इतिहास प्रेरणादायी होता असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक प्रा. लिलाधर पाटील यांनी केले. येथील श्री. छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज एक युगपुरुष’ या विषयावर यावेळी प्रा. पाटील यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष तथा तहसीलदार सुभाष दळवी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सी. गो. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. तोरवणे, माजी प्राचार्य डॉ. पी.डी. देवरे, प्रभाकर चौधरी, एस.एन. खैरनार, प्रा. एल.जी. सोनवणे, संदीप पाटील, बापूसाहेब शिंदे, ग्रा.पं. सदस्य सुमित नागरे, देविदास पाटील, दिलीप भामरे, प्राचार्या मिनाक्षा जावळे, वाचनालयाचे कार्यवाह आर.डी. भामरे, प्रा. डी.एन. खैरनार, बी. एम. भामरे, नरेंद्र खैरनार आदी उपस्थित होते. प्रा. लिलाधर पाटील व्याख्यानात पुढे म्हणाले की, इतिहास म्हणजे भूतकाळाचा वर्तमान काळशी चालेला सुसंवाद असून या वर्तमान काळातही आपल्या हातून इतिहास घडत असतो. परंपरा आणि आधुनिकता सृजनांना जन्म देत असते. मात्र त्या परंपरेची जाण आणि भान आपण राखले पाहिजे. कारण चुकीचा इतिहास समाजात अंधश्रध्दांना जन्माला घालण्याचे काम करीत असतो. प्लेटोने आपल्या ग्रंथातून लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना सर्व प्रथम मांडली. मात्र या ग्रंथातील कल्पना कुठलाही जगातील राजा अंमलात आणू शकला नाही. जगजेत्ता अलेझांडरही हे करु शकला नाही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी लोक कल्याणकारी राज्यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. क्युबात व व्हीएतनाममध्ये झालेल्या राज्यक्रांतीचे प्रेरणास्थान शिवाजी महाराजांची राज्य पध्दती आहे. ही अभिमानाची गोष्ट असल्याची बाब लक्षात येते मात्र आपण विश्व कल्याणकारी राज्यांला संकुचीत करण्याचे पातक करीत असल्याची खंतही प्रा. लिलाधर पाटील यांनी व्यक्त केली. विचार, पुस्तक, इतिहासही क्रांतीची कारक असू शकते. मात्र ही कारक रस्त्यावर उतरुन क्रांती करु शकत नाहीत. हा विचार पुस्तकातून, इतिहासातून आपल्या डोक्यात घेवून चालणारी माणसेच क्रांती करु शकतात. शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास हा क्रांतीची बीज पेरणारा इतिहास असल्याचे नमुद करुन शिवाजी महाराजांच्या अस्सल इतिहासाची साधणे आज अभ्यासने आवश्यक असल्याचे सांगतांना परमानंद लिखीत शिवभारत, शिवाजी महाराजांची पत्रे, सभासदांची बखर, मुधभूषणम्‌ ही पुस्तके अभ्यासने आवश्यक असल्याचे नमुद केले. तत्पर्वी सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन पंचायत समितीचे सभापती ज्ञानेश्वर नागरे, तहसीलदार सुभाष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आ. जयवंत ठाकरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत पवार, हाजी सत्तार उमराणी, ऍड. उत्तमराव मराठे, प्रा. एल. जी. सोनवणे, एस.एन. खैरनार, प्रा. विनय शाह, मनोज कार्ले, प्रा. नरेंद्र तोरवणे, मुलदकरंजे, नरेंद्र खैरनार, आबा सोनवणे, कैलास चाळसे, आर. डी. भामरे, डी. एन. खैरनार आदी उपस्थित होते. या दोन्ही कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे प्रमुख विजय भोसले यांनी केले. तर आभार नरेंद्र खैरनार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल दिलीप पाटील, राजेंद्र सोनार, राजेंद्र लाडे, अग्नीहोत्री पाटील आदींनी परीश्रम घेतले।

शिवाजी महाराज देशाचे अमृत संजीवनी एसएसव्हीपीएसच्या शिवचरित्र व्याख्यानमालेत गुलाब वळसे-पाटील यांचे मत
धुळे, दि. 18 (प्रतिनिधी)-( धुळे, 19-February-2011 )
Tags : Dhule
शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नाही तर देशाचे अमृत संजीवनी होते. अन्यायाच्या विरोधात लढणार्‍या शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टी अंगीकारल्या त्याचा धडा सद्याच्या राजकारण्यांनी घेण्याची गरज आहे असे मत शिवचरित्र व्याख्यानकार गुलाब वळसे-पाटील यांनी व्यक्त केले.
शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नाही तर देशाचे अमृत संजीवनी होते. अन्यायाच्या विरोधात लढणार्‍या शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टी अंगीकारल्या त्याचा धडा सद्याच्या राजकारण्यांनी घेण्याची गरज आहे असे मत शिवचरित्र व्याख्यानकार गुलाब वळसे-पाटील यांनी व्यक्त केले. धुळ्यातील गरुड मैदानावर श्री. शिवाजी विद्याप्रसारक संस्थेतर्फे शिवचरित्र व्याख्यानमाला घेण्यात येत आहे. या व्याख्यानमालेत शिवचरित्रकार गुलाब वळसे-पाटील यांनी आज दि 18 रोजी दुसरे पुष्प गुंफले. याप्रसंगी जिल्हाधिकारी गोकूळ मवारे, डॉ. भाईदास पाटील, माजीमंत्री रोहिदास पाटील, कुणाल पाटील, उत्कर्ष पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी गुलाब वळसे-पाटील यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांनी तरुणांच्या मनातील कर्तृत्वाचा यज्ञ प्रजोलित केला. अन्यायाच्या विरोधात कधी न शांत झालेला झंझावाद म्हणजे राजा छत्रपती होय. अत्याचारी माणसाच्या शरिरावर घाव घालून त्यांच्या रक्ताच्या थेंबथेंबातून स्वराज्य उभे करण्यात शिवाजी महाराजांनी कामगीरी बजावली. तरुण नेतृत्व असलेल्या शिवाजी महाराजांनी जनतेच्या सुख, दु:खाशी समरसता दाखविली. त्यामुळेच जनताजनर्दानाची ताकद उभी राहीली. महाराष्ट्रात मोगलशाही, आदिलशाही, कुतबशाही यांचा बोलबाला होता. त्यात महाराष्ट्र पिसला जात होता तेव्हा शिवाजी महाराजांनी शुन्यातून स्वराज्य उभारले. महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार येवढीच त्यांच्या कार्याची ओळख नव्हती तर एक अष्टावधाने, अष्टपैलू, प्रजाहित दक्ष, चारित्रसंपन्न, थोर सेनानी, दूरदृष्टीचा जाणता राजा दुसरा कुणी झाला नाही. शिवाजी महाराज धार्मिक होते सांधूसंतांचा आदर करणारे होते. मात्र धर्मभोळे नव्हते, शत्रुशी प्रसंगी तडजोड करणारे होते. परंतु व्यवहारी होते. ध्येयशुन्य नव्हते. महाराष्ट्र राज्याचे ते छत्रपती होते. जनतेचे हित आणि कल्याण ते कधी विसरले नाही. शेतकर्‍यांना बि-बियाणे आणि अवजारे देण्यासह धर्म सुधारकांना त्यांनी मदत केली. शिवारायांचे राज्य सगळ्यांचे राज्य होते. कर्तृत्व, बलिदान, निष्ठेचे फळ यामधून स्वराज्य साकारले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांना स्वामीनिष्ठ सेवकांची कमतरता कधी पडली नाही. म्हणूनच राजनितीत त्यांचे संकीर्तन जगाच्या पाठीवर केले जाते. असेही वळसे-पाटील म्हणाले. या व्याख्यानमालेत उद्या दि. 19 रोजी तिसरे आणि शेवटचे पुष्प प्रा. अरुण घोडके हे शिवरायांचे आठवावे रुप या विषयावर गुंफणार आहे.
शिवरायांनी जगण्याचा मंत्र दिला -प्रा.घोडके शिवचरित्र व्याख्यानमालेचा समारोप; भव्य शोभायात्रा
धुळे, दि. 19 (प्रतिनिधी)-(20-February-2011)
Tags : Dhule

छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नाहीतर माणसाला जगण्याचा मंत्र दिला. असे प्रतिपादन प्रा. अरुण घोडके यांनी केले. धुळ्यातील गरुड मैदानावर श्री. शिवाजी विद्याप्रसारक संस्थेतर्फे शिवचरित्र व्याख्यानमाला गेल्या तीन दिवसापासून घेण्यात येत आहे. आज या व्याख्यानमालेचा समारोप झाला. समारोपाचे पुष्प प्रा. अरुण घोडके यांनी शिवरायांचे आठवावे रुप या विषयावर गुंफले. यावेळी जिल्हाधिकारी गोकूळ मवारे, पोलिस अधीक्षक शशिकांत शिंदे, माजीमंत्री रोहिदास पाटील, ऍड. सौ. अनुराधा शिंदे, मधुकर गर्दे, कुणाल पाटील, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, दरबासिंग गिरासे, उत्कर्ष पाटील, एम.जी. धिवरे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. घोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र उलगडून सांगितले. त्यात त्यांनी हिंदवी स्वराज्यांची स्थापना करुन गरीब जनतेला न्याय मिळवून दिला. जीवनातील प्रत्येक प्रसंगाना ते धैर्याने समोरे गेले, कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा. असे आवाहनही त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ हिंदवी स्वराज्य निर्माण केले नाही तर जनतेला जीवन जगण्याचा मंत्रही दिला असेही प्रा. घोडके यांनी सांगितले. शिवाजी विद्याप्रसारक संस्थेतर्फे दरवर्षी व्याख्यानमाला घेण्यात येते. तसेच आज शिवाजी महाराजांच्या जन्म दिनानिमित्त भव्य शोभायात्रा शहरातील विविध मार्गावरुन काढण्यात आली. या शोभायात्रेत सजीव देखावे देखील सादर करण्यात आले होते. शोभायात्रानिमित्त रांगोळ्यांनी रस्ते सजविण्यात आले होते.


शिवरायांना अभिवादन
धुळे, दि. 20 (प्रतिनिधी)-(21-February-2011)
Tags : Dhule,Blog

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भारत मुक्ती मोर्चा, मुलनिवासी संघ, छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टॉप, भारत मुक्ती मोर्चा व ऑटो रिक्षा चालक मालक संघातर्फे अभिवादन करण्यात आहे. यावेळी प्रकाश शिरसाठ, राजदिप आगळे, अशोक कवाडे, ऍड. प्रसेनजित बैसाणे, सतिष अहिरे, राकेश मोरे, शाम मोरे, विजय करनकाळ, भारत जाधव, सुनिल आगळे, वामन अहिरे, शांतीलाल गवळी, राजेश खैरनार, सुरेश झाल्टे आदी उपस्थित होते।

शिवजयंतीनिमित्त उद्या शोभायात्रा
धुळे, दि.17 (प्रतिनिधी)- ( धुळे, 18-February-2011 )
Tags : Dhule
शहरासह जिल्ह्यात शिवजयंती उत्सवानिमित्त दि. 19 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यात बंदोबस्तात वाढ करण्यात आला तसेच मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
शहरासह जिल्ह्यात शिवजयंती उत्सवानिमित्त दि. 19 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यात बंदोबस्तात वाढ करण्यात आला तसेच मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. मराठा युवक मंडळ- जिल्हा मराठा युवक मंडळातफेर् शिवजयंती उत्सव दि. 19 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता मराठा मंगल कार्यालय येथून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. राजवर्धन कदमबांडे, धुळे ग्रामीणचे आ. प्रा. शरद पाटील, डॉ. सुभाष भामरे, तर शोभा यात्रेचे उद्‌घाटन महापौर मोहन नवले हे करतील. प्रमुख पाहुणे म्हणून शाम जाधव, अतुल सोनवणे, कुणाल पाटील, उत्कर्ष पाटील, विजु देवकर, योगीराज मराठे, डॉ. जितेंद्र घुमरे, विजय ढोबळे, प्रविण भडक आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दीपक रवंदळ, सचिव अनिल जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र ढवळे, चंद्रकांत थोरात, नैनेश साळुंके, रजनीश निंबाळकर, शाम रायगुडे, राजेंद्र जाधव, संदीप सूर्यवंशी, अविनाश बहादुरगे, पुरुषोत्तम जाधव, वामन मोहिते, बाळासाहेब ठोंबरे, रमेश साळुंके आदींनी केले आहे. कॉंग्रेस कमिटी- जिल्हा व शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनोहर टॉकीज समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास कॉंग्रेसचे पदाधिकारी, सभासद, युवक कॉंग्रेस, कॉंग्रेस सेवादल, महिला कॉंग्रेस, एन. एस. यू. आय., इंटक, अल्पसंख्यांक यांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच महापालिका, जि. प. पं.स.चे सभासद, प्रदेश प्रतिनिधी तसेच कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर, शहर अध्यक्ष युवराज करनकाळ यांनी केले आहे. तीन चाकी सायकल स्पर्धेचे आयोजन- अ.भा. मराठा महासंघावतीने शिवजयंती निमित्त अपंग बांधवांकरिता तिन चाकी सायकल स्पर्धेचे आयोजन दि. 19 रोजी शिवतिर्थ संतोषी माता चौक साक्रीरोड येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्रसंगी ग.स. बँकेचे गटनेते सी.एन. देसले, सुनील सोनार, डॉ. सुभाष भामरे, खा. प्रतापराव सोनवणे, प्रा. शरद पाटील, शेखर पाटील, अतुल सोनवणे, महेश घुगरी, विजयकुमार ठोंबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सतिष महाले, सुनिल महाले, चंदू सोनार, दिलीप जगताप, सुनिल कदमबांडे, स्वप्नील महाले, राजू शिंदे, भुरा शिंदे, अंकुशराव पाटील, रघुनाथ ताकटे, गणपत पवार, पुरुषोत्तम जाधव, गोविंद साखला, विकास मिरजकर, संदीप महाले, भटु गिरमकर, हिंमतराव थोरात, मनोहर पाटील, भरत पवार, राजु कौठळकर, बी. बी. गीते, रामदास सूर्यवंशी, सुनिल देवरे, डॉ. बी. एफ. पाटील, जाधव, चिंतामण ताकटे, विलास लवांदे, विजय देवकर, रावण नवले, प्रमोद साळुंगे, किशोर शिंदे, विनायक शिंदे, शशि रवंदळे, काशिनाथ मराठे, ल. की. चहाकर, उदय ठाकरे, दिलीप जाधव, राजाराम जाधव, गोरख रासकर, दिलीप वाघ, चंद्रकांत रावळे, लक्ष्मण भवर, संदीप पाटोळे अरविंद जावळे, निंबा मराठे उपस्थित राहणार आहेत. साक्री वाचनालय- श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी साक्री येथील श्री. छत्रपती शिवाजी वाचनालयाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन वाचनालयाचे अध्यक्ष तथा तहसीलदार सुभाष दळवी यांच्या हस्ते होणार असुन पुतळा पुजन कार्यक्रमाच्या साक्री पंचायत समितीचे सभापती ज्ञानेश्वर नागरे व इतर मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी श्री. छत्रपती शिवाजी महाराज एक युगपुरुष या विषयावर प्रा. लिलाधर पाटील (अमळनेर) यांचे व्याख्यान आयोजित करणात आला आहे. सदर व्याख्यान वाचनालयाच्या सभागृहात सायंकाळी 5.30 वा आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सी. गो. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. तोरवणे हे उपस्थित करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन वाचनालयाचे उपाध्यक्ष अजीज खॉ पठाण, कार्यवाह आर. डी. भामरे, सांस्कृतिक कार्यक्रम समिती प्रमुख विजय भोसले, सहकार्यवाह प्रा. जे. एन. खैरनार, संचालक प्रा. विनय शाह, जितेंद्र मराठे, मनोज कार्ले, आबा सोनवणे, मुनंद करंजे, नरेंद्र खैरनार, सौ. मिनाक्षी जावळे, बी. एम. भामरे आदींनी केले आहे. मनाई आदेश लागू- दि. 19 फेब्रुवारी 2011 रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्याने एखाद्या क्षुल्लक कारणावरुन वाद होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) नुसार जिल्ह्यात मनाई आदेश जिल्हाधिकारी गोकूळ मवारे यांनी जारी केला आहे.

नंदुरबार शिवजयंती २०११

नंदुरबार मध्ये शिवकुटूंब मेळाव्यात चंद्रशेखर शिखरे ह्यांचे व्याख्यान,शिवजयंतीचा उत्साह .
नंदुरबार (प्रतिनिधी)-(20-February-2011)
Tags : Nandurbar

महाराष्ट्रात छत्रपतींच्या नावावर मराठीचे राजकारण केले जात असल्याचा आरोप इतिहास संशोधक चंद्रशेखर शिखरे यांनी केला तर आजच्या परिस्थितीत प्रशासनामध्ये शिवाजीचे मावळे तयार होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पत्रकार ज्योती तोटेवार यांनी केले. शिवजयंतीनिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज नाटयमंदिरात आज शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित शिवकुटूंब मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी 60 वर्षापुर्वी शिवधर्म विचाराने विवाह करणार्‍या शाहीर हरिभाऊ पाटील आणि सौ.उषाताई पाटील यांचा खास गौरव करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहीर हरिभाऊ पाटील होते. मेळाव्याचे उद्घाटन इतिहास संशोधक चंद्रशेखर शिखरे, शाहीर राजेंद्र कांबळे, पत्रकार श्रीमती ज्योती तोटेवार यांच्याहस्ते करण्यात आले.प्रारंभी शाहीर राजेंद्र कांबळे यांनी शिवरायांवर पोवाडे सादर केले.त्यानंतर श्रॉफ हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी अफजलखानाचा वध या विषयावर नाटीका व पोवाडा सादर केला. श्री.शिखरे यावेळीे म्हणाले, इतिहासातून आपल्याला चुका सुधारण्याची संधी मिळत असते. जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो, तो कधीच पुढे जावू शकत नाही.समाजाला गुलाम करायचे असेल तर त्याच्या इतिहासाचा खून केला जातो.याप्रमाणे इतिहासाचा खून करण्याचा घाट रचला गेला आहे.मुख्य इतिहास बदलून बनावट इतिहास समाजापुढे सादर करण्यात आला आहे.आपल्यापुढे ठेवण्यात आलेले प्रतिक लंगडे असेल तर आपणही लंगडे होतो,हे इतिहासातून शिकले पाहिजे.शिवरायांचा विकृत इतिहास समाजासमोर आणण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. श्री.शिखरे पुढे म्हणाले, अफजलखानाचा वध कसा झाला हे दस्तुरखुद्द शिवरायांनी आपल्या ‘शिवभारत’या पुस्तकात लिहून ठेवले आहे.जिजाऊने खान आणि शिवरायांची प्रतापगड येथे भेट घेण्याचे ठरविले.शिवबाला आशीर्वाद दिला आणि स्वराज्यासाठी पुत्र गमावला तरी चालेल पण खानरुपी छळवाद, पिळवणूक खत्म करण्याची आज्ञा दिली.त्यानंतर अफजलखानाला वाघनखाने जखमी करण्यात येवून जीवा महाले नावाच्या डोंबार्‍याने त्याचा वध केला.अफजलखानाच्या सैन्याला माघारी पाठविले.त्याच्या कुटूंबालाही सन्मानाने परत पाठवले. खानाच्या कबरीसाठी त्यांनी प्रतापगडच्या पायथ्याशी 2 एकर जागा दिली.दोन मन तेल भवानी मातेच्या मंदिरातून दरवर्षी देण्याचे जाहीर केले.असे शिवरायांचे औदार्य होते. ही कबर उध्वस्त करुन त्यांचे शौर्य लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे,असेही ते म्हणाले. श्री.शिखरे पुढे म्हणाले, शिवरायांची लढाई ही धार्मिक होती, असे सातत्याने सांगीतले जाते.मात्र शिवरायांच्या सैन्यात जसे मुसलमान तसे खानाच्या सैन्यात हिंदू सरदारही होते. धार्मिक लढाई असती तर एका समाजाचे सरदार एका पारडयात राहिले असते.त्यामुळे शिवरायांचा लढा हा राजकीय होता.छळवणूक, शोषणमुक्तीसाठी त्यांनी बंड पुकारले होते.स्वराज्यापेक्षा कोणतीही व्यक्ती, जात, समाज मोठा नाही. इतिहासात शिवरायाने खानाला कपटाने मारले असे पंडीत नेहरु सांगत.हेच नेहरु 1962 ला चीनला गेले.त्यानंतर हिंदी चिनी भाई-भाई म्हणत चिनने आक्रमण केले.अटलबिहारी वाजपेयींनी समझोता एक्सप्रेस सुरु केली, त्यानंतर परवेज मुशर्रफने एक पुस्तक भेट दिले.त्यात ‘शत्रुला गाफील ठेवून लढले पाहिजे’ असे एक वाक्य होते.ती ओळ रेखांकीत केली होती. शिवरायांच्या लढयाचा बोध पाकिस्तान व चीनने घेतला.पण भारताने स्विकारला नाही, याची खंत वाटते असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, शिवरायांनी आरमार उभारले.त्यात 100 जहाज उतरवले.त्यांनी पोर्तुगिजांना कोणताही कर दिला नाही.उलट संभाजीराजांनी त्यांच्याकडूनच करवसुली केली.मात्र,त्यानंतर सत्तेवर आलेल्या पेशव्यांनी शिवरायांचे आरमार समुद्रात बुडवले. तसे झाले नसते तर इंग्रज भारतात आले नसते.एवढी भरभक्कम बांधणी शिवरायांनी करुन ठेवली होती.शिवरायांचे राज्य गुजरात,मध्यप्रदेश,कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडूपर्यंत होते. पण त्यांना महाराष्ट्रापुरते मर्यादीत ठेवले गेले, असेही ते म्हणाले. श्री.शिखरे पुढे म्हणाले, मराठयांचा इतिहास हा स्त्रियांच्या शौर्याचा आहे.जिजाऊने शहाजी राजे नसतांना अत्यंत कुशलपणे राज्य चालवून शिवरायांना घडवले. संभाजीराजांची पत्नी येसूबाईनेही उत्तमपणे राज्याचा सांभाळ केला. ताराराणीच्या काळात औरंगजेब संपला. अहिल्याबाई होळकरांनी 26 वर्ष लोककल्याणकारी राज्य केले. म्हणूनच स्त्रियांना घराबाहेर काढा, त्यांचे व्यक्तीमत्व फुलू द्या, असे आवाहनही त्यांनी केले. अलिकडे छत्रपतींच्या नावावर मराठीचे राजकारण केले जात आहे. पण शहाजीराजांना 12 भाषा, शिवरायांना 6 तर संभूराजांना 16 भाषा अवगत होत्या.शिवरायांनी स्वतःसाठी ‘साहेब’ हा शब्दप्रयोग केला, तो पारशी भाषेतील होता. आरमार हा शब्द पोर्तुगीज भाषेतील होता.त्यामुळे आज मराठीचे राजकारण करणारेदेखील आपल्या नावात ‘साहेब’ लावत आहेत. त्यांची मुले इंग्लिश स्कुलमध्ये शिकत आहेत.जगाची भाषा ही इंग्रजी आहे, ती प्रत्येकाला आलीच पाहिजे, असेही श्री.शिखरे म्हणाले. ज्योती तोटेवार यांचे व्याख्यान पत्रकार ज्योती तोटेवार यांचे ‘विद्यार्थ्यांनो अधिकारी व्हा’ या विषयावर व्याख्यान झाले.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षाबंाबत तसेच पालकांना मार्गदर्शन केले.सौ.तोटेवार म्हणाल्या की, बहुजन, मराठा समाजातील तरूणांनी आयपीएस होवू नये, असा काही नियम नाही. मात्र आपल्या मुलांमध्ये न्युनगंड निर्माण झाला आहे.उच्चशिक्षीत गर्भश्रीमंत लोकांचीच मुले अधिकारी होतात हा गैरसमज आहे.स्पर्धेच्या युगात बहुतेक विद्यार्थ्यांना एमपीएससी, युपीएससीबाबत माहिती नसते, ही शोकांतिका आहे.जिजाऊंनी शिवबांना बाळकडू दिले.त्यातून त्यांच्यावर संस्कार घडले.त्यामुळे प्रशासनात आज शिवाजीच्या मावळयांची गरज निर्माण झाली आहे.आजच्या विद्यार्थ्यांना विचार करायला वेळ मिळत नाही.त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यास पालकांकडून विरोध दिला जातो. एखाद्या तरूणाना खेळात रूची असते. मात्र आई-वडील डॉक्टर आहेत म्हणून त्याने डॉक्टर व्हावे, असा आग्रह धरला जातो. हे धोरण बदलले पाहिजे.पालकांची मुलांचा कल समजला पाहिजे. यात आईची भुमिका महत्वाची ठरते.प्रत्येकात वेगळा गुण असतो.तो विकसीत न झाल्यास त्याचे जीवन निरर्थक होते. मुलांच्या अतरमनाचा विचार करणे आवश्यक आहे.मुलांवर संस्कार घडविण्याचे काम आईचे असते. आपण स्वतःला शिवबाचे वंशज म्हणून घेतो.त्यामुळे मुलांना शिवबासारखे घडवा. त्यावर संस्कार टाका, असे आवाहन केले.ज्योती तोटेवर पुढे म्हणाल्या की,जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक मार्ग निवडा. एखादा बहुजन समाजातील मुलगाही सचिन तेंडूलकरप्रमाणे फलंदाजी करू शकतो, असा विश्वास निर्माण करा.सामान्य कुटूंबातील खडी फोडणारा बालाजी मंगळे हा जिद्दीने शिक्षण घेवून लातुरचा कलेक्टर होवू शकतो, हे उदाहरण डोळयासमोर ठेवा.त्यामुळे आपला एकाग्रता कायम ठेवा. आयुष्यातून मार्गक्रमण करतांना योग्य दिशा निवडा. महिलांना मागे खेचले जाते. मात्र लौकीक वाढविणार्‍या महिलांना प्रेरणा दया, असे आवाहन केले.यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सौ.तोटेवार म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरूचे स्थान महत्वाचे आहे.पहिला गुरू आई व नंतर शिक्षण देणारे शिक्षक गुरू असतात. आज स्पर्धेचे युग असले तरी विद्यार्थ्यांनी न्युनगंड बाळगू नये. नियोजन करून विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे.यामुळे निश्चित अधिकारी व्हाल, असे सांगितले. शेवटी मेळाव्याचे अध्यक्ष शाहीर हरिभाऊ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.प्रबोधन घडविण्याचे सुरू ठेवण्यात येईल.अशा विविध उपक्रमांतून बहुजन समाजाला जागृती निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवजयंती उत्सव कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज पवार, प्रा.प्रशांत बागुल यांनी केले.हरिभाऊ पाटील यांच्या अध्यक्षीय भाषणाने सांगता झाली.आभार शिवराम पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी संजय कुवर, राजेंद्र पाटील, आर.आर.पाटील, हंसराज पाटील, शशिकांत पाटील, नंदलाल पाटील, प्रकाश पाटील, उमेश भदाणे, मधुकर पाटील, किरण पाटील, अनिल पाटील, किरण पाटील यांनी नियोजन केले.रमेश पाटील, एन.डी.नांद्रे, कुंदन पाटील, किशोर पाटील,अनिल भामरे, साळूंके, श्याम जाधव, देवा बोराणे, मनोहर पाटील,धनराज पाटील, सतिष पाटील,प्रफुल्ल पाटील, डॉ.चेतन बच्छाव, कल्याण पाटील, योगेश बाविस्कर, सौरभ पाटील, प्रांजल पाटील यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते. डॉ.कमलाताई मराठे, संध्या पाटील,डॉ.शोभाताई मोरे, चंद्रशेखर बेहरे, प्रा.बी.एस.पाटील आदी उपस्थित होते. आ.प्रा.शरद पाटील यांनी आर्थिक मदत केली. प्रतिभा शिंदे यांचीही उपस्थिती होती.


नंदुरबार मध्ये शिवजयंती उत्साहात...

नंदुरबार (प्रतिनिधी)- (21-February-2011)
Tags : Nandurbar,Blog

तालुक्यातील खोंडामळी येथील नुतन माध्यमिक विद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवाजी महाराज व जिजाऊंचा जीवंत देखावा सादर करण्यात आला. मिरवणूक खोंडामळी गावात काढण्यात आली. गावातील शिवरायांच्या पुतळयाचे पुजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एम.पिंपळे, पर्यवेक्षक के.एन. साळूंके, डॉ.एन.डी.नांद्रे, ए.बी. पाटील, आर.पी.भामरे, बी.एस. कदमबांडे, एस.पी. पवार शिक्षकांनी केले. प्रा.एन.डी. वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन आर.एच.मोरे यांनी केले।

शिवरायांना अभिवादन
नंदुरबार (प्रतिनिधी) - (21-February-2011)
Tags : Nandurbar,Blog

येथील प.खा भगिनी सेवा मंडळ धुळे संचलित प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शिवरायांच्या अशा चरित्राविषयी श्रीकृष्ण काबरा व मुख्याध्यापिका सौ.भागिनी महाले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला।


छडवेलला शिवजयंती साजरी
नंदुरबार (प्रतिनिधी) -(20-February-2011)
Tags : Nandurbar,Blog

छडवेल येथील नुतन मराठा विद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य शत्रुघ्न पाटील होते. यावेळी शत्रुघ्न पाटील, बालू पाटील, डी.एन.पाटील, बापू खैरनार, लहू पानपाटील, आबा खैरनार, अनिता निकवाडे, प्रभाकर पवार, सुरेश सोनवणे, त्र्यंबक माळी यांनी प्रतिमा पुजन केले. प्राचार्य पाटील यांनी थोरपुरूषांची चरित्रे आपण वाचली तर आपले चरित्र घडत असते असे सांगून अधिकाधिक चरित्रे वाचण्याचे आवाहन केले।

छत्रपतींना अभिवादन
नंदुरबार (प्रतिनिधी) - (20-February-2011)
Tags : Nandurbar,Blog

येथील क्षत्रिय सुर्यवंशी मराठा मंगल कार्यालयात शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मेजर रामदास पवार यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष श्याम मराठे, चंद्रकांत मराठे, जिल्हा ग्रामोद्योग फेडरेशनचे अध्यक्ष रोहिदास पवार, संत दगा महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष मोहन मराठे, हिरालाल मराठे, अर्जुन मराठे, जितेंद्र मराठे, चंदु मराठे, नितेश मराठे, योगेश मराठे, पावबा मराठे, जितेश मराठे, राहुल मराठे आदी उपस्थित होते.

अहमदनगर शिवजयंती २०११

मिरवणुकांच्या दणदणाटात शिवजयंती उत्साहात साजरी



नगर, १९ फेब्रुवारी/प्रतिनिधी
छत्रपती शिवाजीमहाराजांची जयंती शहर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त काढलेल्या मिरवणुकीत शालेय विद्यार्थ्यांची विविध पथके सहभागी झाली होती. वाद्यवृंदाचा गजर, शिवरायांचा घोष यामुळे वातावरण दुमदुमून गेले होते. परिसरातही ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी झाली.
माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजीमहाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ मुख्य कार्यक्रम झाला. सकाळी नऊच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन, महापौर संग्राम जगताप, मनपा आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते शिवराय व राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यास अभिषेक करून पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपमहापौर नजीर शेख, स्थायी समितीचे सभापती संजय गाडे, जि. प. बांधकाम विभागाचे सभापती बाळासाहेब हराळ, पोलीस उपअधीक्षक श्याम घुगे, जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे उपाध्यक्ष रामनाथ वाघ, सचिव जी. डी. खानदेशे, मनपा उपायुक्त आर. ए. देशमुख, केंद्र सरकारचे वकील सुभाष भोर, वकील संघाचे माजी अध्यक्ष माणिक मोरे, प्राचार्य साठे, बहिरनाथ वाकळे, जिजाऊ बिग्रेडच्या अध्यक्षा माया कोल्हे, आदी उपस्थित होते.अभिवादनानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. या चौकात मोठी गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी ती दूर केली.
मिरवणुकीत जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पथके, महाविद्यालयीन तरूण, अध्यापक विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. झांजपथकाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. या वेळी शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमा असलेले रथ, वाहने सहभागी झाली होती. महापालिका शिक्षण मंडळाचा रथ मिरवणुकीत सहभागी झाला. वारकरी दिंडी, हातात तलवारी घेतलेले मावळे पथक, त्यानंतर भाले घेतलेले पथक, झांजपथक अशा थाटात मिरवणूक काढण्यात आली. रेसिडेन्सिअल विद्यालयाच्या प्रांगणात येऊन तिचा समारोप झाला. सावेडी, केडगाव तसेच नगर तालुक्यातील निमगाव वाघा, नेप्ती येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय पवार, तोफखान्याचे निरीक्षक अशोक ढेकणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
निमगाव वाघा येथे अखिल भारतीय मराठा महासंघ व नवनाथ विद्यालयातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी मुख्याध्यापक भास्कर सुपेकर, महासंघाचे तालुकाध्यक्ष नाना डोंगरे, किसन वाबळे, काशिनाथ पळसकर आदी उपस्थित होते. नेप्ती येथील प्राथमिक शाळेत आबा लोंढे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच मीरा जपकर होत्या. जि. प. सदस्य अरूण होळकर, मुख्याध्यापिका हिराबाई सोनवणे, रामदास फुले, बाबासाहेब पवार उपस्थित होते. केडगाव येथील कांबळेवस्तीत शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धा, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. अध्यक्षस्थानी अशोक गायकवाड होते. धोंडीराम कांबळे यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले.

शिवज्योतीचे स्वागत
शिवजयंतीनिमित्त विळद घाट येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवनेरी ते नगर अशी शिवज्योत आणली. त्यामध्ये रवींद्र भोर याने १८, तर शिवप्रसाद जाधव याने २२ किलोमीटर दौड केली. विद्यार्थ्यांच्या पथकाचे या वेळी स्वागत करण्यात आले.

शिवछत्रपती, राजमाता जिजाऊ पुरस्काराचे पुढील वर्षांपासून शिवजयंतीस वितरण - जाधव



नगर,१९ फेब्रुवारी/प्रतिनिधी
शिवछत्रपती व राजमाता जिजाऊ पुरस्काराचे वितरण पुढील वर्षीपासून शिवाजी महाराजांच्या जयंतीस करण्याचे तसेच पुरस्कार निवडीतील राजकीय हस्तक्षेप टाळला जाईल, असे आश्वासन क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी काल (शुक्रवारी) येथे दिले.
वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलाच्या वादाबाबत जाधव यांनी काल नियोजन भवनात क्रीडा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी बोलताना माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी शिवछत्रपती पुरस्कार शिवजयंतीस देण्याची प्रथा खंडित झाल्याकडे लक्ष वेधले. आपण तत्कालीन क्रीडामंत्री रामकृष्ण मोरे यांच्याकडे हा प्रश्न विधानसभेत मांडला होता. मात्र, त्यानंतर केवळ सन२००३-०४ मध्ये शिवजयंतीला हे पुरस्कार दिले गेले. त्यानंतर पुन्हा ही प्रथा खंडित झाली. ती पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
पुढील काळात शिवछत्रपती व जिजाऊ पुरस्कार शिवजयंतीस वितरित करण्याची काळजी घेऊ, सध्याच्या पुरस्काराची निवड निश्चित झाली आहे. मात्र, काही कारणाने यंदाचे हे वितरण शिवजयंती होऊ शकत नाही. आपल्याकडे क्रीडा खाते कायम राहिल्याने निवडीत राजकीय हस्तक्षेप होणार नाही याचीही काळजी घेऊ. निवड केवळ तज्ज्ञ व्यक्तींच्या समितीकडूनच व गुणवत्तेच्या आधारावरच केली जाईल, असे आश्वासन जाधव यांनी दिले.

छत्रपती शिवाजीमहाराज हे वैश्विक राजे - प्रा. हरी
नरके




जामखेड, २० फेब्रुवारी/वार्ताहर
छत्रपती शिवाजीमहाराजांचा संघर्ष धार्मिक नव्हता, तर त्यावेळच्या परिस्थितीशी होता. शिवाजीमहाराज हे वैश्विक राजे होते. ते कोणत्या एका जातीचे राजे होते, अशी भूमिका घेता येत नाही. इतिहासाचे फेरलेखन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन समितीचे अध्यक्ष प्रा. हरी नरके यांनी केले.
येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजीमहाराज शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रा. नरके बोलत होते. जि. प. माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी डी. एस. भुजबळ अध्यक्षस्थानी होते. जि. प. सदस्य प्रा. मधुकर राळेभात, सरपंच प्रा. कैलास माने, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरूण चिंतामणी, डॉ. पी. जी. गदादे, सय्यद मन्सूरभाई, जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य आर. बी. देशमुख, संस्थेचे अध्यक्ष भानुदास बोराटे, छत्रपती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य पी. जे. नागरगोजे उपस्थित होते.
प्रा. नरके म्हणाले की, शून्य टक्क्य़ाने कर्ज देणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी होय. पेरणी, तसेच अन्य कामासाठी गरजेप्रमाणे कर्ज दिले जाते. एखाद्यास कर्जाने दिलेली मुद्दल फेडणेही शक्य नसेल, अशा शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे असे राजांनी सांगितले होते. छत्रपती शिवरायांनी संपत्ती मिळविली, परंतु ती एकटय़ाची मानली नाही. ती त्यांनी रयतेची मानली. आता मात्र पुण्याई शाहू, फुले, आंबेडकरांची आणि प्रत्यक्ष काम वेगळेच अशी स्थिती आहे. प्रा. राहुल चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. के. बी. सगळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. बी. तरटे यांनी आभार मानले।

पारनेर मध्ये शिवजयंती उत्साहात




पारनेर, १९ फेब्रुवारी/वार्ताहर
प्रभावी सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत अवघ्या १० वर्षांच्या प्रांजली साठे या विद्यार्थिनीने मराठा सेवासंघ, संभाजी ब्रिगेड व विविध शिवप्रेमी संघटनांनी आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात पारनेरकरांची मने जिंकली. भाषणानंतर तिच्यावर बक्षिसांचा अक्षरश: वर्षांव झाला.
मराठा सेवासंघाने घेतलेल्या ४ गटांतील वक्र्तृत्व स्पर्धेत प्रांजलीने खुल्या गटातील स्पर्धकांची बोलतीही बंद केली. पारनेर बसस्थानक परिसरात पार पडलेल्या शिवजयंती सोहळ्यात मोठय़ा जनसमुदायासमोर प्रांजलीने प्रभावी भाषण केले. मराठा सेवासंघ, संभाजी ब्रिगेड, तसेच दोस्ती ग्रूपच्या वतीने आयोजित शिवजयंती महोत्सवाचा प्रारंभ तहसीलदार गोविंद शिंदे यांच्या हस्ते शिवरायांच्या अर्धकृती पुतळ्याच्या पूजनाने झाला. पोलीस निरीक्षक तुकाराम वहिले, बाजार समितीचे सभापती काशिनाथ दाते, जि. प. सदस्य वसंत चेडे, सरपंच राजेंद्र तारडे, उपसरपंच विजय डोळ, सैनिक बँकेचे अध्यक्ष अर्जुन चौधरी, दीपक नाईक, बबन वाबळे, दादाभाऊ शेटे, सुदाम कोरडे आदी उपस्थित होते. मराठा सेवासंघाचे विभागीय अध्यक्ष संभाजी औटी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिवजयंतीनिमित्त ग्रामीण रूग्णालयात आयोजित रक्तदान शिबिरासही चांगला प्रतिसाद मिळाला. सुधाकर डुंबरे यांचे शिवचरित्रावरील व्याख्याने, तसेच शहरातून काढलेल्या मिरवणुकीस पारनेरकरांचा प्रतिसाद मिळाला. शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत माऊली बालकाश्रमाच्या विद्यार्थ्यांनी शारीरिक कसरती, लाठी-काठी, तलवारबाजी यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. अध्यापक विद्यालयाचे विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी झाले होते. जयप्रकाश साठे यांनी सूत्रसंचालन केले. शंभू दुधाडे यांनी आभार मानले. किरण सोनवणे, संजय रेपाळे, केशव अडसूळ, संपत म्हस्के, के. बी. बांडे, कांतिलाल कोकाटे, संजय कावरे, अभय गट, विजय वाबळे, संजय ढवळे आदींनी परिश्रम घेतले.
निघोज, वडनेरला उत्साहात
निघोज/वार्ताहर -
येथील मळगंगा विद्यालय, तसेच वडनेरच्या जि. प. प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथे आयोजित कार्यक्रमात कॅप्टन विठ्ठलराव वराळ, निमा संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक सरोदे, निवृत्त प्राचार्य शिवाजी पिंपरकर, हिंदवी शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी वराळ, मळगंगा पतसंस्थेचे संचालक रामदास लंके, व्यवस्थापक दिलीप वराळ, भैरवनाथ पतसंस्थेचे व्यवस्थापक सोमनाथ वरखडे, मुख्याध्यापिका रेखाताई वराळ आदी उपस्थित होते. डॉ. सरोदे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. पिंपरकर यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. किसन वरखडे यांनी आभार मानले.
कोल्हारला ५ तास मिरवणूक
कोल्हार/वार्ताहर -
छत्रपती शिवाजीमहाराज की जय, अस जयघोष, झांजपथकाचा निनाद, मावळ्यांच्या पोशाखातील घोडेस्वार, फटाक्यांची आतषबाजी अशा जल्लोषात शिवजयंतीनिमित्त आज शिवप्रतिमेची येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली.दुपारी ग्रामदैवत श्री भगवतीमाता मंदिरापासून शिवप्रतिमेच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. मावळ्यांच्या पोशाखातील ४ घोडेस्वार मिरवणुकीच्या अग्रभागी होते. नानगाव (दौंड) येथील झांजपथक, भंडारदरा येथील कलाकारांनी सादर केलेले आदिवासी काम्बड नृत्य हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. या मिरवणुकीत शिवजयंती महोत्सव समितीचे सदस्य, विविध सामाजिक संघटना, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व शिवप्रेमी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. कोल्हार भगवतीपूर शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सकाळी ग्रामदैवत भगवतीमाता मंदिरासमोरील भव्य प्रांगणात उत्सवास प्रारंभ झाला. शिवनेरीहून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले. सरपंच सुरेंद्र खर्डे, डॉ. संजय खर्डे, उपसरपंच श्रीकांत खर्डे, वसंतराव खर्डे, अशोकलाल आसावा, कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष हरिभाऊ जिजाबा खर्डे, भास्कर दिगंबर खर्डे, बाळकृष्ण खर्डे, सयाजी खर्डे आदींच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले।

राजमुद्रा ग्रुपच्या वतीने कर्जतला



शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
कर्जत, १९ फेब्रुवारी/वार्ताहर

येथे शिवजयंतीनिमित्त राजमुद्रा ग्रुपने अध्यक्ष विजय तोरडमल यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रम आयोजित केले होते. सकाळी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंकाळी शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी राजेंद्र फाळके, नामदेव राऊत, अशोक खेडकर, बाळासाहेब साळुंके, विजय तोरडमल, शरद भैलुमे, सचिन पोटरे, सचिन जाधव, स्वप्नील देसाई, दीपक शिंदे, ज्ञानदेव लष्कर आदी उपस्थित होते. बसस्थानकाजवळ रिपाइंच्या वतीने शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वरील सर्व मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी शहरातून शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. यावेळी राजमुद्राचे विजय तोरडमल उपस्थित होते.
तालुक्यातील दिघी येथेही शिवछत्रपती तरूण मंडळाच्या वतीने शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. शिवप्रतिमेस प्रा. चंद्रकांत राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रोहित राजेनिंबाळकर, दीपक राजेनिंबाळकर, महेश राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते।

मराठा महासंघातर्फे पाथर्डीत भव्य मिरवणूक



पाथर्डी, १९ फेब्रुवारी/वार्ताहर
शहर व तालुक्यात शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. युवक राष्ट्रवादी काँग्रेस व मराठा महासंघाच्या वतीने या वेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली.
केळवंडीच्या तरूणांनी शिवनेरीहून आणलेली शिवज्योत पाथर्डी ते केळवंडी अशी मिरवणुकीने नेण्यात आली, तर शिरापूर, खांडगाव व टाकळीमानूर येथेही मिरवणुका काढण्यात आल्या. कसबा विभागातील स्वराज युवा प्रतिष्ठानने प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केला होता. युवक राष्ट्रवादी व मराठा महासंघाने काढलेल्या मिरवणुकीत शिवाजीमहाराजांचा न्याय हे पथनाटय़, मावळ्यांचे पथक, बँड, ढोलीबाजापथक सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर भगवे झेंडे लावले होते. मिरवणुकीत युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष महेश बोरूडे, मराठा महासंघाचे अध्यक्ष बंडू बोरूडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अभय आव्हाड, नगरसेवक नंदकुमार शेळके, संजय भागवत आदी सहभागी झाले होते.
तिसगाव येथे दिलीप अकोलकर मित्रमंडळ व तिसगाव विकास मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. येथे राजीव राजळे यांचे व्याख्यान झाले. कसबा विभागातील शिवपुतळ्यास आमदार चंद्रशेखर घुले यांनी, तर पंचायत समिती आवारातील पुतळ्याला सभापती काकासाहेब शिंदे यांनी पुष्पहार घातला. राजीव राजळे मित्रमंडळाचे कार्यकर्ते नगरसेवक बंडू बोरूडे, सीताराम बोरूडे यांनीही शिवजयंती साजरी केली.

छत्रपतींच्या विचारांची शिदोरी प्रत्येक घटकाला उपयोगी - विखे



राहाता, १९ फेब्रुवारी/वार्ताहर
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या विचारांची शिदोरी तरूण पिढीला आणि समाजातील प्रत्येक घटकाला उपयोगी पडत आहे, असे प्रतिपादन कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या ३८०व्या जयंतीनिमित्त डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित अभिवादन सोहळ्यात ते बोलत होते.
कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे यांच्या अध्यक्षस्थानी हा कार्यक्रम झाला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, कामगार संघटनेचे सरचिटणीस अविनाश आपटे, कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर, कारखान्याचे संचालक उपस्थित होते.
विखे यांच्या हस्ते शिवाजीराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. ते म्हणाले की, रयतेचे शिलेदार म्हणून राजांचे व्यक्तिमत्व आपल्यापुढे उभे राहते. स्वराज्य मिळवून देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन त्यांनी नवा विचार दिला.
यावेळी कारखान्याचे संचालक शांतीनाथ आहेर, अण्णासाहेब कडू, केरूनाथ चेचरे, शशिकांत घोलप, सर्जेराव खर्डे, दीपक पाटील, रामदास निकम, कार्यकारी संचालक आर.डी. शितोळे, सरव्यवस्थापक बी. एन. सरोदे आदी उपस्थित होते।

ढोलताशांचा गजर, तसेच खंडेश्वराचा यळकोट या वातावरणात पिंपरी जलसेन येथे आयोजित बैलगाडय़ांच्या शर्यतीला आज अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव शेळके यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्गाटन झाले. जि. प. सदस्य राजाराम एरंडे, जिल्हा बँकेचे संचालक उदय शेळके, पं. स. सदस्य सुभाष बेलोटे, उद्योगपती विष्णुशेट कदम, सरपंच लहू थोरात आदी उपस्थित होते. आंबेगाव, जुन्नर, पारनेर, शिरूर या ४ तालुक्यांतून शेकडो बैलगाडय़ांनी शर्यतीत सहभाग घेतला.
मालमोटारी, टेम्पो या वाहनांतून वाजतगाजत बैलगाडे येत होते. घाटाच्या सभोवती कडय़ावरून हजारो गाडाशौकिन शर्यतीचा आनंद लुटत होते. दुपारी दीडवाजता सुरू झालेली शर्यत सुमारे ४ तास चालली. उदय शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सरपंच थोरात यांच्या नेतृत्वाखाली शर्यतीचे नियोजन करण्यात आले. सुमारे लाखभर रूपयांची बक्षिसे देण्यात आली.
बैलगाडा शर्यतीचा घाट दुरूस्त करण्यासाठी गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून खर्च केला. सकाळी काठय़ांची मिरवणूक, खंडेश्वराचा अभिषेक, महाप्रसादाचे आयोजन, शिवजयंती उत्सव, विविध विकासकामांची उद्घाटने व भूमिपूजन करीत ही यात्रा गावकऱ्यांनी मोठय़ा उत्साहात साजरी केली।

शिवजयंतीनिमित्त आज नगरमध्ये मिरवणूक



नगर, १८ फेब्रुवारी/प्रतिनिधी
उद्या (शनिवारी) साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी जिल्ह्य़ात सुमारे पावणेतीन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या परिसरात विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन, पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उद्या पुतळ्याची पूजा करून अभिवादन करतील. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने सकाळी आठ वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. विविध पथके, शाळकरी मुले व नागरीक मिरवणुकीत सहभागी होतील.
शिवजयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे भिस्तबाग चौकात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन काल सत्यपाल महाराजांच्या हस्ते झाले. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांचे व्याख्यान आज झाले. छावातर्फे भिंगार येथे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आलमगीर रस्त्यावरील द्वारकाधीश कॉलनी येथे होईल. दुपारी १० ते २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर, तसेच सायंकाळी ५ वाजता शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. रविवारी वसतिगृहातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष गणेश िशदे यांनी सांगितले.
शिवजयंतीच्या पाश्र्वभूमीवर पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरात २ अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ३ उपअधीक्षक, १० निरीक्षक, १८ उपनिरीक्षक व ४५० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्य़ात ८ पोलीस उपअधीक्षक, ४५ निरीक्षक, ५२ उपनिरीक्षक व २ हजार ५०० पोलीस असा बंदोबस्त असेल.

वाशिम शिवजयंती २०११

वाशिम जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात
शिवजयंतीनिमित्त वाशीममध्ये मोफत नेत्रतपासणी




वाशीम, १८ फेब्रुवारी / वार्ताहर
अखिल भारतीय छावा संघटना व राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे शिवजयंतीनिमित्त शनिवार, १९ फेब्रुवारीला वाशीम बसस्थानकासमोर मोफत नेत्र तपासणी व आंतरभिंगारोपण नेत्रशस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबीर सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत होणार असून नेत्ररुग्णांची शस्त्रक्रिया येथील सामान्य रुग्णालयात होणार असल्याची माहिती आयोजक व छावा संघटनेचे विदर्भ संपर्क प्रमुख मनीष डांगे यांनी दिली.
या शिबिरामध्ये जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. अभय पाटील, डॉ. कविता ठाकरे, नेत्रचिकित्सा अधिकारी जगदीश बाहेकर, किरण हाके व त्यांचे सहकारी नेत्ररुग्णांची तपासणी करून उपचार करणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन रतनगड येथील संत गोपाल बाबा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. म्हात्रे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजू चौधरी, वाशीमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, सार्वजनिक शिवजयंती सोहोळ्याचे अध्यक्ष गंगूभाई बेनिवाले, भाजप शहर अध्यक्ष मिठूलाल शर्मा, नगरसेवक नागोराव ठेंगडे, राजू वानखेडे, अजय वाघ, हरीश सारडा, बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन पगार, कार्याध्यक्ष बाळासाहेब देशमुख, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे, पीरिपाचे जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे, रिपाइंचे अध्यक्ष गोवर्धन चोथमल, वसंत धाडवे, अ‍ॅड. जोगी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्ष सोनाली ठाकूर, काँग्रेस महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अलका मकासरे, सरकार इंगोले, बबन भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष बबलू अहीर आदी उपस्थित राहणार आहेत.

यवतमाळ शिवजयंती २०११


शिवजयंती उत्सव आर्णीत थाटात साजरी




आर्णी, २० फेब्रुवारी / वार्ताहर
येथे शिवजयंती उत्सव सोहोळा मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शिवनेरी चौक व शिवाजी चौकातील शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मराठा सेवा संघाच्यावतीने आयोजित सोहोळ्यात असंख्य शिवप्रेमींनी मोठय़ा संख्येनी हजेरी लावली होती. गांधीनगरातील प्राथमिक मराठी शाळेत आयोजित सोहोळ्यात माजी आमदार श्रीकांत मुनगीनवार, मौलाना आझाद आर्थिक अल्पसंख्याक विकास महामंडळाचे संचालक ख्वाजाबेग, यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजूदास जाधव प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तिन्ही वक्तयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. त्अध्यक्षस्थानी तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. गिरीधर कुबडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बबन मुडवाईक यांनी केले. कार्यक्रमाला पंचायत समितीने उपसभापती विठ्ठल देशमुख, हरीश कुडे, सरपंच श्रावण मडावी, उपसरपंच शे. मोहीब, माजी उपसरपंच छोटू देशमुख, माजी सरपंच अरुण राऊत, खुशाल ठाकरे आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. कार्यक्रमासाठी गिरीधर कुबडे, सुदर्शन चव्हाण, लक्ष्मण हिरवे, गजानन जगताप, पुरुषोत्तम झापे, दिलीप वानखडे, विश्वंभर उपाध्ये आदींनी विशेष परिश्रम घेतले।

शिवाजी महाराज बुद्धिवान लढवय्ये होते - डॉ. आ.ह. साळुंके



दारव्हा, १७ फेब्रुवारी / वार्ताहर
शिवरायांचा प्रताप आठवत असताना ते अत्यंत बुद्धिमान लढवय्ये होते, याचे भान २१व्या शतकात जपणे अत्यावश्यक आहे, ही खरी शिवरायांप्रती निष्ठा असावी, असे कळकळीचे आवाहन डॉ. आ.ह. साळुंके यांनी ‘शिवरायांचे संस्कार आणि शिक्षण’ या विषयावर बोलताना केले.
येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शिवजयंतीनिमित्त चार दिवसीय व्याख्यानमाला सोशल क्लबच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना डॉ. साळुंके यांनी शिवरायांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवण्यात मॉ जिजाऊ व शहाजी यांचे योगदान कसे महत्त्वाचे आहे, हे सोप्या शब्दात व्यक्त केले. संस्कार आणि शिक्षणातून ते अत्यंत बुद्धिमान लढवय्ये बनले. शिवराय बुद्धिमान लढवय्ये होते, याचा कधीही विसर पडू नये, अशी त्यांनी कळकळीची विनंती केली.
अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री संजय देशमुख होते. दिनेश नरवडे यांनी आभार मानले. व्याख्यानास श्रोत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. उद्या १८ फेब्रुवारीला प्रभाकर गावंडे यांचे व्याख्यान होणार असून १९ फेब्रुवारीला मिरवणुकीचे आयोजन केले आहे.

परभणी शिवजयंती २०११

परभणी शिवजयंतीचा उत्साह

परभणीत शिवभक्तांची जल्लोषी मिरवणूक



परभणी, १९ फेब्रुवारी/वार्ताहर
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आज शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत जिल्हाभरातून वारकरी मंडळी सहभागी झाली होती. टाळमृदंगाच्या गजरात विठुरायाच्या जयघोषात ही मिरवणूक श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघाली.
आज सकाळी श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या कार्यक्रमात प्रथम शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे, पोलीस अधीक्षक रघुनाथ खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, अ. भा. वारकरी मंडळाचे अध्यक्ष बालासाहेब मोहिते-पाटील आदी उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांनी यज्ञकुमार करेवार, ह. भ. प. धोंडीगिरी मिरखेलकर, लक्ष्मी काळदाते, ह. भ. प. मधुकरबुवा लोहगावकर, केशवराव नावकीकर, राधिका भालेराव आणि पोलीस कर्मचारी सय्यद अफसर सय्यद जफर यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर शिवजयंतीची मिरवणूक निघाली. यामध्ये मोठय़ा संख्येने वारकरी सहभागी झाले होते. भजनी मंडळे तल्लीन होऊन टाळमृदंगाच्या गजरात विठुरायाचा जयघोष करीत मार्गस्थ झाले. या वेळी डॉ. शालिग्राम वानखेडे आणि रघुनाथ खैरे यांनीही टाळ हाती घेऊन काही काळ सोबत केली. भजनी मंडळींमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. वयोवृद्ध वारकऱ्यांनी मृदंगाच्या ध्वनीवर ताल धरला. यानंतर महाप्रसादाने मिरवणुकीची सांगता झाली.
नगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण
परभणी नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा जयश्री खोबे यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी मुख्याधिकारी दीपक पुजारी, श्री. देशमुख, मुंढे आदी कर्मचारी उपस्थित होते.
रायगड मित्रमंडळाची रॅली
रायगड मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शिवरायांचा जयघोष करीत ती शहराच्या विविध भागांतून नेण्यात आली. या वेळी सहभागी युवकांकडे भगवा ध्वज होता.

हिंगोली शिवजयंती २०११

हिंगोलीत विविध कार्यक्रमांद्वारे शिवजयंती उत्साहात साजरी



हिंगोली, १९ फेब्रुवारी/वार्ताहर
शहरात विविध कार्यक्रमांतून शिवजयंती साजरी करण्यात आली. मराठा सेवा संघ व इतर संस्थांनी एकत्रपणे विविध स्पर्धाचे तसेच २३ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गांधी चौकात शनिवारी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडय़ाचा कार्यक्रम घेण्यात आला.
महात्मा गांधी चौकात शनिवारी मराठा महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी माजी खासदार शिवाजी माने यांनी शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक केशव पाटील यांनी शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली त्यांनी इतरांच्या धर्माचा आदर राखल्याचे सांगितले.
माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणातून हिंगोलीत शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी पालिकेतून एकमताने जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मंजूर करून रामकृष्णा लॉजसमोर जागा दिल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय निलावार यांनी केले.
शनिवारी दोन गटात सामान्य ज्ञान स्पर्धा व कराटे स्पर्धा घेण्यात आल्या. रविवारी जागतिक सामाजिक दिवस, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले आहे. २३ ला रांगोळी स्पर्धा व विविध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. शहरातील निरंजन चौकात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन, जिल्हा गणित अध्यापक मंडळ, सत्यनारायण विद्यामंदिर, आदर्श महाविद्यालय तसेच ग्रामपंचायत औंढा नागनाथ,कलमनुरी,वसमत, सिरसम (बु।), केंद्रा (बु।), पुसेगाव आदी ठिकाणी शिवजयंती विविध कार्यक्रमांतून साजरी करण्यात आली.

नांदेड शिवजयंती २०११

शिवरायांच्या जयजयकाराने लोहानगरी दुमदुमली



लोहा,नांदेड १९ फेब्रुवारी/वार्ताहर
छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने लोहानगरी दुमदुमली. संपूर्ण शहरात रोषणाई, आकर्षक आणि मनोवेधक आतीषबाजी, आदिवासी नृत्य, स्वराज्यभिषेकाचा जिवंत देखावा आणि उंच घोडय़ाचा समावेश असलेली छत्रपती शिवरायांची भव्य मिरवणूक आज शहरातून निघाली. माजी आमदार प्रताप पाटील यांच्या वतीने काढलेल्या मिरवणुकीत नागरिक सहभागी झाले होते.
शिवाजी चौकापासून मोटरसायकल फेरी निघाली. जुन्या शहरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रताप पाटील यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आल्यानंतर शिवरायांना अभिवादन करून मिरवणूक निघाली. यामध्ये सर्व जातीधर्माचे लोक सहभागी झाले होते. शिवजयंतीनिमित्त मिलिंद पवार यांनी मोटारसायकल फेरी काढली होती.
आदिवासी नृत्य, स्वराज्यभिषेकाचा जिवंत सोहळा, आकर्षक मूर्ती मंडप यासह लेझिम आणि आतीषबाजीने जयंती सोहळा आनंदात पार पडला. या वेळी शहरातील मान्यवर, राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी शिवरायांना अभिवादन केले. यामध्ये पंचायत समिती सभापती केशव पाटील, कंधारचे पंचायत समिती सभापती रामचंद्र राठोड, कृउबा सभापती रुस्तुम धुळगंडे, उपसभापती रंगनाथ भुजबळ आदींसह मोठय़ा संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते.

भोकरमध्ये अपूर्व उत्साह
भोकर-
नगरपालिकच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष डॉ. विजयकुमार दंडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी सभापती शिवाजीराव पांचाळ, डॉ. पुरुषोत्तम कल्याणकर, विनोद पा. चिंचाळकर, विनायक कदम यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

गंगाखेडमध्ये देखाव्यांसह मिरवणूक
गंगाखेड-
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज शहरात उत्साहात साजरी झाली. सकाळी विविध कार्यालयांत छत्रपतींना अभिवादन करण्यात आले. दुपारी सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा व प्रतिमेची सवाद्य देखाव्यांसह मिरवणूक काढली. प्रतिमेचे पूजन नगरसेवक रामप्रभू मुंडे, गोविंद निरस, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गोविंद यादव यांनी केले. कलावंत गोपी मुंडे यांच्या नादबिंदू मंडळाने सादर केलेल्या शिवरायांच्या सजीव देखाव्याने लक्ष वेधले. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष उमाकांत फड, बाळासाहेब मडके, विवेकानंद माने, विजय अवचार, सिद्धार्थ धिटे, संतोष वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.

मराठवाडा शिवजयंती २०११

औरंगाबाद शहरात शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी



औरंगाबाद, १९ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी
औरंगाबाद शहरात शनिवारी शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध पक्ष आणि संघटनांतर्फे मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीपासून शनिवारी सायंकाळी मिरवणुकीला प्रारंभ झाला. रात्री उशिरा या मिरवणुकीचा समारोप झाला.
औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीतर्फे मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अनेक संस्थांनी सजीव देखावे साकारले होते. लेझिम, टाळ मृदंग यामुळे शहांगज, सराफा, मच्छली खडक, गुलमंडी हा मार्ग दणाणून गेला होता. या मिरवणुकीचा समारोप क्रांतिचौकात करण्यात आला. या मिरवणुकीत आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार संजय वाघचौरे, माजी खासदार उत्तमसिंह पवार, ज्येष्ठ नेते मधुकरराव मुळे, पोलीस आयुक्त श्रीकांत सावरकर, शिवजयंती समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अध्यक्ष विनायक गुंजाळ, हर्षवर्धन तुपे पाटील, रंगनाथ काळे, प्रकाश मुगदिया, सुभाष झांबड, अभिजीत देशमुख, संदीप शेळके, मनमोहनसिंग ओबेरॉय, जी.एस.ए. अन्सारी, तनसुख झांबड आदी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांदे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त नामदेव जोगदंड यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
विद्यापीठात शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ कुलगुरु डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. प्रवेशद्वारापासून ते विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताश्यांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा घोषणा देत ही मिरवणूक काढण्यात आली.
उस्मानाबादेत शिवजयंती साजरी


उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रमिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय अधिकारी सुनील यादव,उपजिल्हाधिकारी दिनकर जायभाय दिसत आहेत.

श्रमिक
गोजमगुंडे यांना शिवबा पुरस्कार प्रदान
Latur News
Thursday, February 20, 2011 AT 05:00 AM (IST)

लातूर (latur) - भूमिपुत्र स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी शिवजयंती निमित्त देण्यात येणारा शिवबा ऐतिहासीक कार्य गौरव पुरस्कार पुण्याच्या सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक संजयकुमार सुरवसे यांनी हा पुरस्कार जाहिर केला होता . कै. विद्याभूषण वाजपेई यांच्या स्मरणार्थ स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असून शिवजयंती दिनी लातूर येथे पुरस्कार वितरण केले गेले,ह्यावेली शिवप्रेमिन्ची मोठ्या संख्येने उपस्थिति होती..

Sunday, February 20, 2011

अकोला शिवजयंती २०११

शिवप्रेमीनी केली शिवजयंती साजरी



अकोला, २० फेब्रुवारी/वार्ताहर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८२ व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा मंडळाच्या वतीने स्थानिक शिवाजी पार्क येथे शिव जन्मोत्सव व पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ७ वाजता नगरसेविका प्रभावती जाधव व रोहिणी पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मराठा सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यां सविता कदम, दुर्गा पवार, कुसुम कावळे, संध्या काकडे, माधुरी बिडवे, मीना सराफ यांच्या द्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची छोटी प्रतिमा पाळण्यात ठेवून परंपरेनुसार पाळणा म्हणण्यात आला.
पेढे व प्रसाद वाटप करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी ९ वाजता महापौर सुरेश पाटील, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, आमदार गोवर्धन शर्मा, भाजपा महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे पाटील, कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष रमेश तायडे, मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष अनिल बिडवे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे प्रा. प्रदीप वाघ, संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले, यावेळी सामाजिक कार्यकर्ता महादेव भुईभार, मनोहर हरणे, विनायक पवार, राजाभाऊ देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले।
अकोल्यात अवतरली शिवशाही...



मराठमोळ्या पोषाखात महिलांची स्कुटर मिरवणूक



अकोल्यात शनिवारी शिवजयंतीची भव्य शोभायात्रा
अकोला, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम शनिवारी येथे घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाची माहिती एका पत्रकार परिषदेत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. प्रदीप वाघ व संयोजक पंकज जायले यांनी दिली.
शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठीचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती यावेळी वाघ यांनी दिली. शहरातील गणमान्य व्यक्तींच्या हस्ते शिवाजी पार्क येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन सकाळी ९.३० वाजता करण्यात येईल. शनिवारी सकाळी १०.३० वाजता येथील तोष्णीवाल लेआऊट येथील प्रभात किड्स येथून मराठमोळ्या पोषाखात महिलांची स्कुटर रॅली शहरातील विविध भागातून काढण्यात येईल व तेथेच या रॅलीचे समापन होईल तर, सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदा शिवजयंती भव्य स्वरूपात साजरी करण्यासाठी ५१ मोठय़ा नगाऱ्यांचा समूह असलेले पथक बोलवण्यात आले आहे. ते भव्य मिरवणुकीत महत्वाची भूमिका बजावतील. त्याचबरोबर राजंदा येथील दिंडी देखील या मिरवणुकीत सहभागी होणार आहे तर, शहरातील दोन व्यायामशाळांचे विद्यार्थी चित्तथरारक कसब दाखवणार आहे. शिवकालीन परंपरा असलेल्या गोंधळी नृत्य या मिरवणुकीत असेल तर, जाणता राजा या महानाटय़ातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे विवेक कोल्हे शोभायात्रेत शिवरायांच्या वेशात त्यांच्या मावळ्यासह सहभागी होणार आहे.
पुणे येथील प्रसिध्द एअर फायर शो चे आयोजन या भव्य मिरवणुकीच्या समापनाच्या वेळी स्थानिक स्वराज्य भवनात रात्री ८ वाजता करण्यात आले आहे. एअर फायर शो रात्रीचे विशेष आकर्षण राहणार आहे. यंदा पहिल्यांदा अकोल्यात अशा प्रकारे एअर फायर शो होणार असल्याची माहिती उत्सव समितीने दिली. सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे कार्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीमार्फत करण्यात येणार आहे. शहरातील तरुणांनी व ज्येष्ठ नागरिकांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यस्मृतीला सामूहिक उजाळा देण्यासाठी हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला उत्सव समितीचे उपाध्यक्ष अनिल बिडवे, मनोहर हरणे, विनायक पवार, प्रा.मधु जाधव, मुरलीधर झटाले हे उपस्थित होते.

रायगड शिवजयंती २०११

रायगडला ‘हेरिटेज-1’ दर्जासाठी प्रयत्न करेन

महाद- कोकणातील किल्ले पुरातत्त्व खात्याच्या सर्वसामान्ययादीवर आहेत. ते हेरिटेज-1च्या यादीवर आल्यास अधिक निधी मिळेल व किल्ल्यांवर सुधारणा अधिक जलद गतीने होतील. याचा विचार करूनच सिंधुदुर्ग, विजयदुर्ग या किल्ल्यांसोबत किल्ले रायगडचे नाव सरकारच्या हेरिटेज-1यादीत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे खासदार डॉ. निलेश राणे यांनी रायगडावर दिले. गुरुवारी त्यांच्या हस्ते किल्ले रायगड ते शिवमंदिर (सिंधुदुर्ग) या शिवतेज मशाल रॅलीस सुरुवात झाली. शिवजयंतीचे औचित्य साधून या रॅलीचे प्रथमच आयोजन केले जात आहे.

या रॅलीच्या निमित्ताने डॉ. निलेश राणे गुरुवारी सकाळी रायगडवर आले. त्या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व जगदीश्वराची विधिवत पूजा केली व त्यांना अभिषेकही केला. त्यानंतर त्यांनी रायगडाची पाहणी करून जगदीश्वर मंदिराच्या प्रांगणातून मशाल पेटवून शिवतेज मशाल रॅलीचा शुभारंभ केला. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, अशा प्रकारच्या रॅलीच्या माध्यमातून तरुणपिढीला छ. शिवाजी महाराजांचा इतिहास, शौर्य, तेज सांगण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. डॉ. राणे यांनी रायगडवरील आणि परिसरातील रहिवाशांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच या प्रश्नांचा संपूर्ण अभ्यास करून परिपूर्ण माहितीसह आपण पुन्हा येथे येऊ, असेही आश्वासन त्यांना दिले.

रायगड रोप-वेसहा दिवस बंद

वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी रायगडवर जाणारा रोप-वे 21 ते 26 फेब्रुवारीदरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. रायगडावर जाणा-या पर्यटकांची संख्या वाढत असल्याने सुरक्षितताही महत्त्वाची आहे. त्यामुळे वार्षिक दुरुस्तीमध्ये काही बदलही करण्यात येणार आहेत.

गोवा शिवजयंती २०११

गोव्यात शिवजयंती उत्साहात...


अहमदनगर शिवजयंती २०११



सोलापुर शिवजयंती २०११




जळगाव शिवजयंती २०११

शिवजयंतीनिमित्त मंगलमय वातावरणात शहरातून मिरवणूक
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 12:00 AM (IST)
जळगाव - शिवजयंती दिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्यावतीने आज (ता. 19) शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्कालीन साजेशा अशा शिवकालीन शिवजयंती मिरणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीत आकर्षण बनले ते बालशिवाजी महाराजांच्या वेशातील बालकाने सोन्याचा नांगर हाकल्याचे ठरले.

शहरातून आज काढण्यात आलेल्या मिरवणूकीची सुरवात गोलाणी मार्केट समोरील आदिती साडीयॉं येथून सकाळी 10 वाजता करण्यात आली. शिवाजी ब्रिगेडच्या मंगलमय शिवकालीन मिरवणूकीची सुरवात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. मिरवणूकीचे उद्‌घाटन आ. सुरेशदादा जैन, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र), प्रमोद पवार, जळगाव पिपल्स को-ऑप बॅंकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, नगरसेवक विष्णू भंगाळे, शरद लाठी यांनी बालशिवाजी महाराजांचे पूजन करून केले. हि मिरवणूक आदिती साडीयॉंपासून सुरवात झालेली मिरवणूक टावर चौक, चित्रा चौक या मार्गाने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. मिरवणूकीत 300 महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी शिवाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक शिवराज दादा नेवे, संस्थापक अध्यक्ष अशोकराव शिंदे, प्रकाश पाटील, डॉ. धनंजय बेद्रें, अर्जुनराव जगताप, डॉ. स्नेहल फेगडे, शशिकांत धांडे आदी उपस्थित होते.

सोन्याच्या नागरांचे आकर्षण
मिरवणूकीची सुरवात मॉं साहेब जिजाऊ यांच्यासोबत बालशिवाजी महाराज सोन्याच्या नांगराने जमीन नांगरतात असा जिवंत देखावा करण्यात आला होता. या सोन्याच्या नांगराचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मिरवणूकीत बालशिवाजी म्हणून सोहम वाणी, तर जिजाऊ मॉं साहेब म्हणून तेजस्वीनी आठवले (रावेर) हे होते.

शिस्तबद्ध मिरवणूक
मिरवणूकीत सजविण्यात आलेल्या रथात सनई चौघडे, मागे अबदागिरी झेंडे धारी मावळे, जिजाऊ मॉं सोबत बालशिवाजी, अष्टप्रधान मंडळ नंतर ब्रम्हवृंद व नऊवारी परिधान केलेल्या मुली, स्त्रिया व मावळे, दमणी अशी अत्यंत शिस्तबद्ध मिरवणूक सनई चौघड्यांच्या गजरात मंगलमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीदरम्यान कसल्याही घोषणा किंवा गुलालाची उधळण करण्यात आली नाही.

यशस्वीतेसाठी डॉ. गणेश पाटील, दिप पाटील, संभाजी पाटील, सागर शिंदे, अनिल पाटील, भुषण लाडवंजारी, मच्छिंद्र सोनवणे, लोणी मराठा समाजाचे अमित पाटील, पंढरी पाटील आदींनी सहकार्य केले.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती
सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीतर्फे बहुजन प्रतिपालक कुळवाडी भुषण जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज क्रिडा संकूल येथे हजारो शिवप्रेमी अनुयायी एकत्र येवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूतळ्याचे पूजन कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष उदय पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश मोरे, सार्व. शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकूंद सपकाळे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे विनोद देशमुख आदी पूजन व अभिवादन करून भव्य मिरवणूकीला सुरवात केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळा तयार केलेल्या रथात बसून रथाच्या चोहो बाजूने भगवान गौतम बुद्ध, संत रोहिदास, संत तुकाराम, संत गाडगे महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर भगतसिंग, बिरसामुडां या बहुजन समाजाच्या महापुरूषांच्या प्रतिमा लावून सजवलेल्या रथातून शिव जयंतीच्या भव्य मिरवणूकीची सुरवात करण्यात आली. यात बैल गाडीला नांगर बांधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी धरलेला सजिव देखावा, राष्ट्रमाता जिजाऊचा सजिव देखावा मिरवणूकीचे आकर्षण ठरले. मिरवणूक कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू चौक, टावर चौक, चित्रा चौक, गोलाणी मार्केट मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

सद्‌गुरू महाविद्यालय
सद्‌गुरू एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र व शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त विद्यार्थी शिक्षक व शिक्षिकांचा समावेश असलेली शोभायात्रा काढण्यात आली. संस्थेचे प्रमुख प्रा. डॉ. नारायण खडके यांच्या हस्ते फीत कापून शोभायात्रेस प्रारंभ झाला. नगरसेविका प्रा. वर्षा खडके, प्रा. अजय इंगळे, प्रा. माधुरी चौधरी, प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. अश्‍विनी अमृतकर, प्रा. दीपाली पाटील, प्रा. लीना पाटील, प्रा. अनिता वानखेडे, प्रा. विजय नारखेडे, प्रा. समाधान बोरसे, प्रा. भादोलकर, प्रा. बन्नोरकर, प्रा. बांगले, प्रा. वंजारी, विद्यापीठ प्रतिनिधी नरेश चौधरी आदी याप्रसंगी उपस्थित होते. घोड्यावरस्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा विद्यार्थी शिक्षक किरण अडकमोल यांनी केली तर, योगेश लांबोळे व मधुसूदन सोनवणे हे मावळ्यांच्या वेशभूषेत होते. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातात भगवे ध्वज व विविध घोषणांची फलके होती. ख्वाजामियॉं, वकील चेंबर्स, नूतन मराठा महाविद्यालय, कोर्ट चौक यामार्गे आलेल्या या शोभायात्रेचा समारोप "शिवतीर्थ' (जी. एस. ग्राउंड) मैदानावर झाला. सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले।

शिवजयंती उत्साहात साजरी
तोंडापूर, ता. जामनेर दि. 21 (वार्ताहर) -(22-February-2011)
Tags : Jalgaon,Blog

येथून जवळच असलेल्या ढालसिंगी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी शिवाजी चौक येथे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पुजा करण्यात आली. त्यानंतर गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी गावातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोभायात्रेत दामू गोतमारे, निलेश गोतमारे, डॉ. दिलीप पाटील, सुधाकर साबळे, अनिले बेलेकर, देवानंद गोतमारे, रितेश गोतमारे, गणेश गाढवे, कमलाकर पाटील, सुनिल गोतमारे, गजानन पवार, प्रविण गोतमारे, कृष्णा इंगळे, निलेश उगले, भारत गाढवे, लक्ष्मण गव्हारे, दीनकर अहिरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.